क्या उखाड़ लिया?

वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया
कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं,
अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख.
असंच खूप काही, मनापासून ठरवलं.
धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं.
डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं,
क्या उखाड़ लिया?

अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली
वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली
झाडांची पानं गळून गेली,
धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली.
निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,
क्या उखाड़ लिया?

ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो,
त्यांनाच खांदा देऊन आलो.
सरणावर थोडा, मीही जळून गेलो.
पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले.
नकळत अशीच कित्येक वर्षं सरली.
थोडीफार उरलेली वर्षं आता खिजवतात,
क्या उखाड़ लिया?

क्या उखाड़ लिया?


स्पर्धेतली कविता© Manish Hatwalne.

Feature Image by Jan Bieler from Pixabay