Posted in English Poems, Poems | Enter your password to view comments
भडकमकर मास्तरांनी ‘साठेचं काय करायचं?‘ ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला ‘राजीव नाईक’ ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला…
आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?
खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा? विचार करत राहिलो, आणि जे सुचले ते इथे मांडायचा प्रयत्न करतो आहे….
मला वाटते, स्वतःची मीडिओक्रिटी जरी ओळखता आली तरी स्वीकारता, पचवता येत नाही. तो पचवण हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार होतो कारण त्यात मीडिओक्रिटी नाकारण्याची (denial) स्टेज संपतच नाही. तिचा ‘acceptance’ ही सगळ्यात अवघड गोष्ट. मग त्यातूनच अपरिहार्यपणे येणारी कौतुकाची, टाळ्यांची लाचारी आणि त्या(च)साठीचे केविलवाणे प्रयत्न… किंवा त्यातूनच निर्माण होणारे असूया/मत्सर्/द्वेष जे ह्या नाटकात दाखवले आहे. ह्या भावना सर्वसामान्य आणि त्यावरील प्रतिक्रियाही लेखकाने म्ह्टल्याप्रमाणे रिपीटिटीव्ह…त्याच, त्याच आवर्तात, भोवर्यात पुन्हा, पुन्हा अडकल्यासारख्या….अगदी अनुभवलेली, वास्तववादी script!
जरा दूर जाऊन, दूरस्थ (त्रयस्थ नाही, पण भावनावेगापासून दूर ह्या अर्थाने - दूरस्थ) राहून विचार करत होतो तेंव्हा वाटले, खरच मीडिओक्रिटी हे एक perception (नेमकं काय म्हणू याला?) शिवाय दुसरं काय आहे? म्हणजे तसे बघितले तर “बेस्ट” हे कोणाच्या तुलनेत? आपल्या वर्तुळातील सहकारी, मित्र-मैत्रिणींच्या की आपल्या गावात, राज्यात, देशात, परदेशात्/विश्वात??? कुठल्या तुलनेत म्हणायचे हे “बेटर” आणि “बेस्ट” आणि मग ही स्पर्धा कोणाशी, कोणा-कोणाशी किंवा कोणा-कोणाच्यात? आणि वेळेचे अजून एक डायमेंशन धरायचे की नाही? म्हणजे सचिन तेंडुलकर हा “बेस्ट” बॅटसमन - हा समकालीन खेळाडुंमधे की त्याची तुलना मग डॉन ब्रॅडमन शी किंवा अजूनही कोणाशी? बर मग सचिन जर “बेस्ट” तर मग बाकिच्यांनी बॅटिंग करुच नये का? अगदी ज्ञानेश्वरीतच (दस्तुरखुद्द ज्ञानेश्वरांनी) म्हटले आहे - सगळ्यात सुंदर चाल राजहंसाची असली तरी इतरांनी चालुच नये का? सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट डॉ. अल्बर्ट एलिस हेच REBT मधे सांगतो!
विचार केला की पटते की आपल्यालाही…अरे असेल लता मंगेशकरचा आवाज स्वर्गीय; पण म्हणून कोणी गायचेच नाही का? का म्हणून तिचे कुठलेही गाणे “बेस्टच”? मी तर आशाच्या ‘कतरा, कतरा…” वर जीव ओवाळून टाकायला तयार आहे. एवढेच नाही तर ‘स्वानंद किरकिरे’ च्या ‘बावरा मन…” वर हजारो गाणी कुर्बान….काय वेडावून टाकते ते गाणे!! असेल आंबा फळांचा राजा, पण संत्र्याला स्वतःची चव आहे, उसाच्या रसाला आगळेच माधुर्य आहे. अरे, असेल सचिन बेस्ट, पण युवराजचा लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह लाजवाब, त्याचा माज पैसा वसूल (२०-२० चे सहा सिक्स? आणि आठवा फ्लिंटऑफ चा चेहरा) आणि गांगुलीचे ऑफ-साईड चे फटके….अफलातून!
मग ह्या मीडिओक्रिटी च्या perception चे दुसरे टोक, शिखर म्हणू हवे तर - ते “पर्फेक्शन”..ते काय? जर ते ‘पर्फेक्ट’ असेल तर ते नेहमीच ‘बेस्ट’ हवं…मग पुन्हा तो प्रश्न, की तुलना करायची तर कशाशी आणि कोणा-कोणाशी? एक परिघ वाढवले की हे सगळेच किती फोल आहे, हास्यास्पद आहे हे जाणवू लागते…आणि मीडिओक्रिटी हे फक्त perception च आहे हेही जाणवते…पर्फेक्शनचा, परिपुर्णतेचा ध्यास, विलोभनीय आहे पण परिपुर्णतेचा अट्ट्हास??? विचार करण्यासारखा प्रश्न आहे….ध्यासात भर आहे तो आपल्या कर्तुत्वावर (प्रोसेसवर), तर अट्ट्हासात अवाजवी भर आहे त्याच्या अनुकुल परिणामांवर (रिसल्ट्सवर)…शिवाय perfection is not a certain/fixed set of XYZ items or formulae. Otherwise perfection would be stagnation.
Hugh Prather म्हणतो, “There is no such thing as ‘the best’ in the world of individuals!” सही आहे!!!
किंबहुना, ह्यातुनच वाटले की जर खरोखरच जे करतो ते मनापासून आवडत असेल, ते करण्यात मजा येत असेल (process satisfaction) तर इतका त्रास होईल का? नैसर्गिक हेवा वाटेल कदाचित, पण चढत्या भाजणीने हे असूया/मत्सर्/द्वेष मनस्वास्थ खराब करतील? ह्या गळाकापू स्पर्धेत खरच आपण process satisfaction विसरत आहोत का? End goal satisfaction हेच एकमेव ध्येय झाले आहे? कॉर्पोरेट जगात हे नेहमीच दिसते पण कलेच्या, सर्जनशील जगात जेव्हा राजीव नाईक ह्यांनी असे लिहिले, तेंव्हा अंगावर सरसरून काटा आला…पण शेवटी कॉर्पोरेट जगात किंवा सर्जनशील जगात, कुठेही असला तरी माणूस हा माणूसच - त्याच्या सगळ्या गुणावगुणांसह!
जर ह्या संदर्भात - बेस्ट/पर्फेक्शन त्याची कॅलिडोस्कोप प्रमाणे दिसणारी विविध रूपं, त्याची relativity (आता मला आवडते आशा जास्त, लताचा आवाज स्वर्गीय आहे मान्य करून सुद्धा!), त्याप्रमाणे स्वतःचे स्वतःच्या मीडिओक्रिटी चे perception आणि process satisfaction; ह्या संदर्भात विचार केला तर मीडिओक्रिटी स्विकारायला, पचवायाला जमेल; इतकेच नाही तर त्याच्यावर मात करायलाही जमेल असे वाटते.
आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते….जमेल तसे….आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट….परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही…आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे… बघावी कालच्या अडखळणार्या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय…कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक….आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने…स्वांतसुखाय!
हे एकदा आतून उमगले की नाही कलह होत स्वत:शी, स्वतःच्या मीडिओक्रिटीशी…अर्थात, हे सगळे माहित असले तरी ‘माहित असणे’ आणि ‘उमगणे’ ह्यात खूप अंतर असते…अंतर असते कदाचित कित्येक वर्षांचे, कधी कधी कित्येक आयुष्यांचे….आणि आयुष्य संपले तरीही न उमगणे ही पण एक दुर्दैवी शक्यता…आणि त्यात ‘राजीव नाईक’ म्हणतात तसा तो ‘भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार’ आणि त्याचे ते ‘रिपीटिटीव्ह’ अविष्कार! भयानकच पण सत्य!! हे नाटक नक्कीच बघणार …जमले तर पुस्तक मिळवतो आधी.
असो!! फार वाहवत गेलो….एकातून एक…लाऊड थिंकींग म्हणा! तुम्हाला काय वाटते, बर्या-वाईट प्रतिक्रिया जरूर लिहा!
Posted in Reasonable Nonsense | 5 Comments »
एका मैत्रीणीच्या, क्षिप्राच्या सांगण्यावरून नुकतेच हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता - आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा! केवळ अफलातून!! अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणार्या ह्या कविता आहेत. त्यात काही मुलीविषयी, नातवाविषयी, आईविषयी आणि पोरक्या, गरीब मुलांविषयी देखील कविता आहेत; पण त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसामावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रुपे आणि रुपके.
संदिप खरेची कवितांची पुस्तके हजारोंनी खपत असतांना ह्या पुस्तकाचे नावही पुस्तकांच्या दुकानदारांना महित नव्हते हे बघून अतिशय दु:ख झाले, एक पुस्तकासाठी १० दुकाने पालथी घातली तेंव्हा ‘साधना’ मध्ये एकदाचे ‘युरेका’ झाले. अर्थात दुःख झाले, पण आश्चर्य नाही वाटले - संदिप खरे, सलिल कुलकर्णी presentation (सादरीकरण? बापरे! :)) मुळे लक्षात राहतात शिवाय त्यांच्या कविताही सहज-सोप्या आणि लोकप्रिय. असो! मुद्दा संदिप खरेच्या कवितांचा नाही (त्यावर लिहिणारे बरेच आहेत) - द. भा. धामणस्कर ह्यांच्या कवितांचा आहे. ह्या कविता एका वेगळ्याच अभिरुचीच्या आणि जाणिवेच्या आहेत - धामणस्कर ह्यांच्यावर जे. कृष्णमुर्ती ह्यांच्या विचारांचा प्रभाव आहे; त्यांच्या कवितांमध्ये आस्था व समंजसपणा प्रसन्नतेने दरवळतांना जाणवतात. त्यांच्या कवितांमधे दुःख असले तरी वैफल्य, उद्वेग नाही; एक सहज, समजुतदार स्वीकार जाणवतो. त्यांच्या कविता ह्या expression (अविष्कार, उस्फुर्त प्रतिक्रिया ह्या अर्थानी) पेक्षा reflection (चिंतन) च्या पातळीवर आहेत असे वाटते. आपल्या अनुभवांकडे, भावनांकडे सह्रद्यतेने पण दूरस्थपणे पाहण्याची दुर्मिळ प्रगल्भता आणि सजगता धामणस्करांकडे आहे. त्यातूनच हे ‘बरेच काही उगवून आलेले’ बहरून आले आहे.
त्या पुस्तकातील माझ्या काही आवडत्या कविता -
साधना
तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे….तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही…
कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही…
परिपक्व झाडे
रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …
मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;
गाणे आपल्याच कंठात उद्भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…
समुद्राविषयी
१.
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.
२.
समुद्र आपल्यासारखाच : दुःखी.
त्याच्या विव्हळण्याचा
समुद्रगर्जना म्हणून प्रथम
कुणी अधिक्षेप केला?
आवेगाने किनार्यापर्यंत
वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना
भरती कुणी म्हटले आणि
डोळ्यात जमणारे पाणी मागे
खेचणार्या निग्रहाला ओहोटी?
अजून काही ओळी ‘नक्षत्रे’ कवितेतील…
नक्षत्रे
……..
४.
रात्रभर,
सगळे तारे माझेच असल्यासारखा मी
त्यांच्याकडे पाहत राहिलोय;
उजाडताना, मीही आकाशासारखाच
पुन्हा कफल्ल्क होणार आहे…
आणि ही शेवटची एक अफलातून कविता; ‘सार’ म्हणावे ह्या योग्यतेची. सगळ्या आयुष्याच्या प्रवासाकडे, त्यातल्या अनुभवांकडे, त्यातून उमगलेल्या आणि झिरपलेल्या ज्ञानाकडे बघण्याचा एक विलक्षण दृष्टीकोन!
बरेच काही उगवून आलेले
तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले….
अजूनही कित्येक मोती विखुरले आहेत या पुस्तकात. पुस्तकातील सगळ्याच कविता इथे देण्याचा उद्देश नाही; मला अतिशय आवडलेल्या ह्या कवितांच्या पुस्तकाची ओळख करून द्यावी असे वाटले, एवढेच. आवर्जून विकत घेऊन वाचावे असे हे - बरेच काही उगवून आलेले!
Posted in Books | 4 Comments »
Another old poem of mine, wanted to put it here with an appropriate image - found that image finally!

As I hold on to those memories, agonies and pain,
Someone inside me whispers, let it go.
I close my eyes and tears fall silently,
And it all comes back again.
Heartbreaks, back stabbing, lies and betrayals,
My heart weeps and again a tear slips.
I carry it all on my shoulder,
In this darkness, time and again I flounder.
I look around in search of the light,
I look within myself for some peace.
So many memories, so much pain and not a shoulder to cry,
Helplessly, I look up and wonder ‘Why?’
But why is never answered and I wonder ‘How?’
How do I heal, how do I find my solace.
And inside me someone whispers, let it go!
No matter how much you are hurt, never let it show,
Don’t waste your tears for those who are not worth it.
Prove you mettle, bear it with grin, get up after every blow,
For no one else, but for yourself, let it go!
Look up at the sky and let it go,
Look at the ocean and let it go,
Look at the mountains and let it go.
Think about the future, its promise and let it go.
Think about the kids, their innocence and let it go.
Think about a mother, her benevolence and let it go.
It’s over when it’s over, get over it,
Bury it deep, never carry it along;
You’ll get tired, because the road is going to be long.
Drop the excess baggage, come on, get going,
Time is running, and the sky is waiting.
Move on, cheer up, let yourself grow,
When you’ll reach up there, you’ll know,
The best way is to let it go!
I whisper it to myself, “Let it go!”
And I see two monks across the river,
Along with the beautiful lady, sing in chorus,
“Let it go, let it go!”
© Manish Hatwalne
(Originally written on : 16 December 2001)
Posted in English Poems, Poems | 1 Comment »
A movie you must not miss…..pleaaaaaaaaaaaaaase go and watch it - at least once! I will be watching it at least 7 times!!! This is just an amazing movie within the limits of a commercial Bollywood movie. Let other people write reviews and discuss all those details, how script was written, how well shots have been taken how well Darsheel & Aamir Khan have acted; as for me, my only review would be tears in my eyes and all those lump-in-the-throat moments I experienced in the movie! Please just go and experience this movie.
Kudos to Amol Gupte (it’s his child after all), Aamir Khan and of course Darsheel Safary!!!
खरच डोळे भरून बघावी आणि भरलेले डोळे न पुसता दाद द्यावी अशीच movie! खरं तर भरलेले डोळे हीच खरी दाद!!!
I am not writing any review myself about the film, but here are some real good ones I have found and just linking them here -
- A brilliant review by Tushar
- A great article by Amol Gupte himself
- Another good article about the movie by Anurag Kashyap
- Aamir Khan’s blog post about the movie
I sort of agree that the end could have been better, if the whole film is so much against “rat race” and not being part of this cut-throat competition; why Ishaan had to win the competition to make for a happy ending? That’s very predictable Bollywod climax & palatable end I guess!! Maybe, Aamir Khan is to be blamed/held responsible for this. But despite that - the film conveys & portrays what it intends to!! If nothing else, it’s a must-watch for Ishaan’s (Darsheel) intensity alone!
Posted in Movies | Tagged aamir khan, bollywood, cinema, darsheel safary, dyslexia, film, movie, taare zameen par | 2 Comments »


